देशभर के मौसम का हाल: 18 से 31 दिसंबर तक कैसा रहेगा मौसम? जानें पहाड़ों
देशभर के मौसम का हाल: 18 से 31 दिसंबर तक कैसा रहेगा मौसम? जानें पहाड़ों
Read More
चने की फसल के लिए बेस्ट पीजीआर: चमत्कार या डबल? जानें फूल आने पर किसका
चने की फसल के लिए बेस्ट पीजीआर: चमत्कार या डबल? जानें फूल आने पर किसका
Read More
कर्जमाफी २०२६: कोणकोणत्या बँकांचे कर्ज होणार माफ? जाणून घ्या सरकारचे धोरण आणि महत्त्वाच्या अटी
कर्जमाफी २०२६: कोणकोणत्या बँकांचे कर्ज होणार माफ? जाणून घ्या सरकारचे धोरण आणि महत्त्वाच्या अटी
Read More
राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार! १९ डिसेंबरला पारा ६ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता
राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार! १९ डिसेंबरला पारा ६ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता
Read More
रेशन कार्ड ई-केवायसी आता मोबाईलवरून! धान्य बंद होण्यापूर्वी ‘अशी’ पूर्ण करा प्रक्रिया
रेशन कार्ड ई-केवायसी आता मोबाईलवरून! धान्य बंद होण्यापूर्वी ‘अशी’ पूर्ण करा प्रक्रिया
Read More

जानेवारी महिन्यात गारपीट होणार का? माणिकराव खुळे यांचा हवामानाचा मोठा अंदाज; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार; पावसाची किंवा गारपिटीची भीती बाळगण्याचे कारण नाही.

जानेवारी महिन्यात पावसाचा किंवा गारपिटीचा अंदाज आहे का?

शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘ला निना’ (La Niña) सक्रिय झाल्यामुळे अवकाळी पाऊस किंवा गारपीट होईल का, अशी चर्चा सुरू आहे. यावर ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याचा ला निना अत्यंत कमकुवत आहे आणि त्याचा महाराष्ट्रावर पाऊस पाडण्याइतपत परिणाम होणार नाही. जानेवारी अखेरपर्यंत राज्यात पावसाचे किंवा ढगाळ वातावरणाचे कोणतेही संकेत नाहीत. गारपिटीचा मुख्य कालावधी हा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असतो; त्यामुळे सध्या तरी गारपिटीची धास्ती बाळगण्याचे काहीही कारण नाही. सद्यस्थितीत हवामान कोरडे राहून कडाक्याची थंडी कायम असेल.

ADS किंमत पहा ×

यंदा थंडीचा कडाका जास्त असण्यामागचे शास्त्रीय कारण

माणिकराव खुळे यांनी सांगितले की, यंदाची थंडी ही मागील काही वर्षांच्या तुलनेत १००% शुद्ध आणि कोणत्याही अडथळ्याविना पडणारी थंडी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल’ (Negative Indian Ocean Dipole). बंगालच्या उपसागराचे तापमान अरबी समुद्रापेक्षा जास्त असल्यामुळे पावसाच्या सर्व प्रणाली दक्षिणेकडे (तमिळनाडू आणि केरळ) मर्यादित राहिल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले नाही आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. परिणामी, थंडी सातत्याने पाझरत राहिली असून ती २६ जानेवारीपर्यंत कमी-अधिक प्रमाणात टिकून राहणार आहे.

Leave a Comment